३६ हजार रुपये नुकसान भरपाई 3 हेक्टर पर्यंत मिळणार मदत

राज्यातील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ३६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे हि ,मदत 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील अवकाळी व गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधी नुसार तीन हेक्टर मर्यादेत जीरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये बागायतीसाठी हेक्टरी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिक नुकसान भरपाईसाठी तब्बल ३६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये मध्ये राज्य सरकारने घेतला होता.

36 हजारापर्यंत नुकसानभरपाई मिळणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाबाहेर जाणून हि मदत देण्यात येणार आहे. या निर्णयाचे अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला होता. राज्याच्या अनेक भागामध्ये शेतकरी बांधव रस्त्यावर देखील उतरले होते.

राज्य सरकारने तातडीने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

एचडी आर एफच्या निकषानुसार यापूर्वी शेतकरी बांधवाना 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण 3 एकरच्या मर्यादेत वाढवण्यात आले.

शासनाच्या या निर्णयामुळे आता ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे अवकाळी पाउस व गारपीट यामुळे नुकसान झाले होते त्यांना आता लवकरच हि मदत मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment